वसुंधरा संजीवनी मंडळ आणि नाम फाउंडेशन

Naam Foundation and imaginiketan

वसुंधरा संजीवनी मंडळ आणि नाम फाउंडेशन

Published onMay 19, 2023

Vasundhara Sanjivani Mandal

Mission to work for water conservation and management in rural areas

एकाच क्षेत्रात काम करणारे समविचारी लोक एकत्र आले आणि त्यांच्याकडून काही काम झालं की ते खूप मोठं असतं.

गेल्या तीन महिन्यात #वसुंधरा_संजीवनी_मंडळ आणि #नाम_फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यात जवळजवळ दहा तलावांचा गाळ उपसा करण्यात आला.

कमी कालावधीत खूप मोठ्या कार्याची पूर्तता शहापूर तालुक्यात झाली आहे. सुप्रसिद्ध ‘नाम फाउंडेशनच्या’ सोबत ‘वसुंधरा संजीवनी मंडळाला’ हे काम करताना खूप मनःपूर्वक आनंद आणि अभिमान वाटला.

आज आम्ही पेरलेलं हे बीज आहे. उद्या पावसाळ्यात ते फळणार फुलणार आहे आणि त्या जमलेल्या पाण्याने आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि समाधानी होणार आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.

आगामी काळातही नाम फाउंडेशन किंवा पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य कुठल्याही संस्थेसोबत वसुंधरा संजीवनी मंडळाला काम करायला निश्चितच आवडेल. “समाज जीवनभरून टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने” या गीताच्या ओळी नसून वसुंधरा संजीवनी मंडळाने ठरवलेले हे ध्येय आहे आणि ते साध्य करण्यात अनेक दिग्गज लोकांची आम्हाला मदत होते आहे. चांगल्या कामाला अनेक हात लागत आहेत ही खूप सकारात्मक बाब आहे.

More from the blog

‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवार’

शहापूर तालुक्यातील कसारा बुद्रुक, शिरोळ, वाशाळा बुद्रुक या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार रथाच्या माध्यमातून प्रचार – प्रसार करण्यात आला. ‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवर’ योजनेच्या माध्यमातून तलावातील

गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार

आज शहापूर येथे पंचायत समिती, शहापूर BDO कार्यालय येथे गटविकास अधिकारी(BDO) श्री. भास्कर रेंगडे साहेब यांची भेट घेतली.महाराष्ट्र शासन, ठाणे जिल्हा प्रशासन, भारतीय जैन संघटना(BJS)

दादरवाडी येथील कार्यक्रम

श्री विश्वजीत नाम जोशी, श्री अजित जोशी, व श्री मिलिंद केळकर यांनी दादरवाडी येथील कार्यक्रमाला श्री भागवत काका, सौ कविता, श्री योगेश व श्री विकास