300350376_569118644962331_6734454967005300038_n
Published onSeptember 7, 2022

Vasundhara Sanjivani Mandal

Mission to work for water conservation and management in rural areas

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट

आज गुरुवार दिनांक १८/८/२०२२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट मुंबई येथील वरळी मधील सुखदा या त्यांच्या कार्यालयामध्ये दुपारी दीड वाजता ठरलेली होती.

या भेटीचे आयोजन वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्या सौ स्मिताताई भिडे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते

या नियोजित भेटीला मुंबईमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी मी ,श्री अरविंदजी देशमुख, श्री नितीनजी पाटील, श्री भागवत काका व श्री मिलिंदजी केळकर यांचे समवेत सकाळी १०.४५ वाजता ठाणे येथून निघालो आणि वरळी परिसरामध्ये ११.५५ मिनिटांनी पोहोचलो.

येथे पोहोचल्यावर श्री नितीनजी गडकरी यांचे स्वीय सहाय्यक श्री अविनाशजी यांनी आमच्या भेटीसंबंधीचे कारण जाणून घेतले. तसेच चहा व पाणी देऊन आमचे उत्तम स्वागतही केले. वसुंधरा संजीवनी मंडळ ज्याप्रमाणे जलसंधारणाचे काम शहापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये करत आहे त्याच पद्धतीचे काम श्री नितीनजी गडकरी हे त्यांच्या एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अकोला भागामध्येगेली २० वर्षे करीत आहेत. त्यांनी केलेल्या कामाची माहिती पुस्तकाद्वारे दिलेली आहे. ती दोन्ही पुस्तके त्यांनी आम्हाला दिली.

१.४०-१.५५ या कालावधीमध्ये माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून ते असे म्हणाले की सध्या समृद्धी महामार्ग चालू आहे व त्यांच्या मदतीने तलावांचा गाळ उपसा करता येऊ शकतो. कारण त्या तलावातील मुरूम,दगड,गोटे किंवा इतर माती ते महामार्गासाठी नि:शुल्क वापरू शकतात. शिवाय ती माती स्वतःच्या खर्चाने वाहून नेतील.

दुसरा एक मार्ग त्यांनी असा सुचविला आहे की मोठ्या नद्यांमध्ये जेथे पुराची शक्यता आहे अशा ठिकाणी नदी जोडकामासाठी ते पाणी वापरता येऊ शकते.

त्यांनी आपल्या वरील संभाषणामध्ये हे सर्व मुद्दे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या पुस्तकामध्ये समृद्धी महामार्ग आणि जलसंधारण यासंबंधीचे एक परिपत्रक दिलेले आहे. त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या सहयोगाने आपल्याला हे काम करता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

धन्यवाद

आनंद राऊळ

More from the blog

‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवार’

शहापूर तालुक्यातील कसारा बुद्रुक, शिरोळ, वाशाळा बुद्रुक या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार रथाच्या माध्यमातून प्रचार – प्रसार करण्यात आला. ‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवर’ योजनेच्या माध्यमातून तलावातील

गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार

आज शहापूर येथे पंचायत समिती, शहापूर BDO कार्यालय येथे गटविकास अधिकारी(BDO) श्री. भास्कर रेंगडे साहेब यांची भेट घेतली.महाराष्ट्र शासन, ठाणे जिल्हा प्रशासन, भारतीय जैन संघटना(BJS)

दादरवाडी येथील कार्यक्रम

श्री विश्वजीत नाम जोशी, श्री अजित जोशी, व श्री मिलिंद केळकर यांनी दादरवाडी येथील कार्यक्रमाला श्री भागवत काका, सौ कविता, श्री योगेश व श्री विकास